topics5

topics5
भाषिक कौशल्य क्षमता :- लेखन


१.लेखनाचे महत्व :
१.अक्षर अविनाशी बनविण्याचे कार्य करण्याची क्षमता लेखन क्षमता होय.
२.लेखनाद्वारे भाव,विचाराची अभिव्यक्ती होते.
३.मराठी भाषा संस्कृत मधून आली आहे व तिचे लेखन उच्चारानुसार होते.
४.जीवनात यश संपादन करण्यासाठी लेखन कौशल्य असणे आवश्यक आहे.
२.लेखनाचे सर्वसामान्य उद्दिष्टे :
१.आत्माविष्कार :मनातील भावना,कल्पना,विचार,लिखित स्वरुपात व्यक्त करणे .
२.प्रचार :आपले विचार ,मत दुसऱ्यापर्यंत लेखनाद्वारे पोहचवणे .
३.मन:शांती :मनातील भावना लिहून मनाला शांतता होते.
४.सुसंस्कार :दुसऱ्याला आपले विचार वाचण्यास दिले असता त्या त्या व्यक्तीवर चांगले सुसंस्कार होतात.


३.लेखनातील शिक्षणातील उद्दिष्टे :
१.वहिवर योग्य रेखा आखणे .
२.लेखन व्याकरण शुध्द व समास पाडून करणे.
३.मुख्य मुद्द्याला अधोरेखा मारणे.
४.अक्षरावर शिरोरेषा मारणे.

४.लेखन सिध्दता व ती कोणत्या गोष्टीवर अवलंबून आहे:
१.पकड :हाताची बोटे व मनगटाच्या बळकटीत ३ से.मी.अंतरावर पेन धरावा .
२.आसनबंध :वि.वयानुसार व उंचीनुसार टेबल खुर्चा असाव्यात .
३.दृष्टी हस्त संयोजन :लेखन करतांना तेथे दृष्टी पोहचेल तिथे हात पोहचावा .

५.सुलेखन :
सुलेखन हे लेखनाचे बाह्यांग आहे.सुवाच्च ,वळणदार ,प्रमाबद्ध व आकर्षक अक्षरात केलेले लेखन म्हणजे सुलेखन होय.
६.चांगल्या हस्ताक्षराचे वैशिष्टे :
१.लेखनातील स्पष्टता वळण व आकार.
२.दोन शब्द व अक्षरातील आंतर .
३.लेखन शुध्दता व लेखनातील गती.
४.लेखनाचे नियोजन .
५.लेखनातील मुद्याची गुंपण.
६.लेखनातील आटोपशीरपणा.
७.लेखनातील लक्ष अकृट करण्यासाठी वापर लेखन हे व्यक्ती मत्वाचे दर्पण आहे.
८.लेखनातील मुख्य मुद्याला अधोरेख करणे.

७.हस्ताक्षर सुधारण्याच्या पध्दती :
१.वर्णमालेचे तक्ते वापरावे.
२.शब्द पट्ट्या वापराव्यात .
३.चित्राचा वापर करावा उदा-गरुड ‘ग’
४.खादी फलकाचा वापर अक्षर काढण्यासाठी .
५.रेषा,गोल ,अर्धवर्तुळ ,कमान काढून अक्षर शिकवावे.
६.रंगीत खडूचा व रंगीत चित्राचा वापर करावा.
७.विद्यार्थाला वर्णमालेच्या वह्या बाजारातुन उपलब्धता करून देऊन प्रात्यक्षिक द्यावे.
८.हस्ताक्षर स्पर्धा घ्यावे.

८.अनुलेखन ,दृकलेखन ,श्रुतलेखन ,गतीलेखन :
१.अनुलेखन :फळ्यावरचे शिक्षकाचे पाहून लेखन करणे त्यास अनुलेखन म्हणतात.
२.दृखलेखन : शिक्षकाने स्वाध्याय दिल्यास त्या प्रश्नांचे उत्तर पाहण्यासाठी पुस्तकातील पाहून लेखन करणे त्यास दृक लेखन म्हणतात.
३.श्रुतलेखन :शिक्षकाचे एकूण लेखन करणे त्यास श्रुतलेखन म्हणतात .
४.गती लेखन :योग्य वेगाने लेखन करणे त्यास गती लेखन म्हणतात.

९.लेखनातील दोष किंवा उणीवा त्यावर उपाय:
१.खराब अक्षर :हस्ताक्षर सुधारण्याच्या पध्दती .
२.अनुचीत गती :रोज श्रुत लेखन देणे.
३.अशुध्द लेखन :ऱ्हस्व दिर्घची ओळख करून देणे.
४.अनुचीत शब्दप्रयोग :योग्य शब्द प्रयोग करणे.
१०.लेखनासाठी योग्य साहित्य व साधनाची निवड :
१.कागद :एक रेषाची ,दोन रेघी,तीन रेषाचा कागद.
२.कागदाखाली धरावयाचा पुठ्ठा :फळी,
३.लेखन :बॉलपेन ,साईपेन ,पेन्सिल.

११.विविध लेखनाचे प्रकार :
१.निबंधलेखन .
२.पत्र लेखन.
३.कथा व संवाद लेखन .
४.संवाद लेखन .
५.कल्पना विस्तार.
६.सारांश लेखन.
७.दैनंदिनी लेखन.
८.अहवाल लेखन .
९.भावानुवाद.
१०.आकलन.
११.निवेदन .
१२.वार्तालेखन.

१.निबंध लेखनाचे प्रकार :
१.कथनात्मक निबंध :घटना,इतिहास,चारित्र्य ,कथायाचे अनुभव आपल्या शब्दात सांगणे त्यास कथनात्मक निबंध म्हणतात उदा-साने गुरुजी.
२.वर्णनात्मक निबंध :व्यक्ती वस्तु,स्थल,प्रसंग यांचे प्रकृती वर्णन करणे त्यास वर्णनात्मक निबंध म्हणतात .
उदा-माझी शाळा .
३.चारित्र्यात्मक निबंध :व्यक्ती ,पशु,पक्षी स्थलाचे चारित्र्य दर्शन मांडणे त्यास चारित्र्यात्मक निबंध म्हणतात.
उदा-माझा आवडता नेता.
४.कल्पना प्रधान निबंध :आपल्या मनातील कल्पना ,भावना,विचार मांडणे त्यास कल्पना प्रधान निबंध म्हणतात .
उदा-मी पंतप्रधान झाली तर .....
५.रसग्रहण निबंध :कथा ,कविता,कादंबऱ्या ,वाचुन निबंध लेखन करतात त्यास रसग्रहणात्मक निबंध म्हणतात .
उदा-माझे आवडते पुस्तक .

२.पत्र लेखनाचे प्रकार व त्यातील आवश्यक गोष्टी :
१.व्यक्तिगत (घरेलु पत्र )
२.व्यावसायिक (कार्यालयीन पत्र )
३.बातमीपत्र .
त्यातील आवश्यक गोष्टी :
१.स्थळ व तारीख :पत्राच्या उजव्या बाजुला कोपऱ्यात व मध्यभागात ‘श्री’शब्द लिहावा.
२.मायना (शिर्षक) :ज्याला पत्र लिहिण्याचे आहे त्यासंबधी
उदा-तिर्थस्वरूप ,प्रिय.
३.आशय (कलेवर ): यात पत्र लिहिण्याचा मुख्य उद्देश लिहणे आवश्यक आहे.
४.शेवट (समाप्ती ): आपले स्वताचे पत्र पाठवणाराचे नाव लिहावे उदा-तुझा मित्र .
५.पत्ता : ज्याला पत्र पाठवायचे त्याचा पत्ता लिहणे आवश्यक आहे.

३.कथा लेखन :
१.कथा लेखन मुद्याच्या साह्याने करावे.
२.कथेतील घटना उभेउभ डोळ्या समोर उभी करणे .
३.कथेतील पात्राची व्यक्तीरेखा व स्वभाव रेखा .
४.कथा सांगणे व कथेतील योग्य शिर्षक देणे.

४.संवाद लेखन :
१.व्यक्ती समोरा-समोर बोलत आहे असे लेखन करणे.
२.दोन व्यक्तीचे भावना,कल्पना,विचार लेखनाद्वारे प्रगट करणे.

५.कल्पना विस्तार :
१.कल्पनेचे आकलन होणे आवश्यक आहे.
२.कल्पना,फुलुन,ती पटून देता यावी .
३.सोपी समर्पक उदाहरणे देणे.
४.निबंधापेक्षा कमी ओळीत कल्पना विस्तार असावा.

६.सारांश लेखन :
१.कल्पना विस्ताराच्या उलट प्रकार आहे.
२.गद्य /पद्य १/३ सारांश लिहावे लागतो.
३.पण सर्व मुद्दे यायला हवे.
४.आपल्या शब्दात लेखन करणे.

७.दैनंदिनी लेखन :
१.व्यक्तीने स्वताच्या स्वता मनाशी साधलेला संवाद म्हणजे दैनंदिनी होय.
२.दैनंदिनी कामाच्या नियोजनाला यशाशक्ती म्हणतात.
३.रोजच्या व्यवहारात आपण केलेली कार्य लिहून ठेवणे.
४.दैनंदिनीत दिनांक ,वार,महिना,लिहून ठेवणे.

८.अहवाल लेखन :
१.शाळेत झालेले विविध कार्यक्रमाचा आढावा मोजक्या शब्दात विद्यार्थी आपल्या वहित लिहून ठेवतात.
२.महत्वाचे मुद्दे गाळू नये.
३.महत्वाच्या व्यक्ती ,घटना याची नोंद ठेवणे.
४.दिनांक ,वार ,महिना लिहिणे.
९.भावानुवाद:
१.मराठीचे हिंदीत रुपांतर करणे.
२.हिंदीतील लेखन मराठीत रुपांतर करणे.

१०.आकलन :
लेखक त्याची भावना,विचार कल्पना,त्याच्या लेखनाद्वारे व्यक्त करत असतो ती आपण वाचुन मनाने लेखन करणे त्यास आकलन म्हणतात.

११.निवेदन :
आपल्या तक्रारी ,सुचना,मागण्या वरिष्ठ अधिकाऱ्या समोर मांडण्यासाठी निवेदन लेखन करावे लागते.
१२. वार्तालेखन :
वर्तमान पत्रात,कविता,कथा,सुविचार व परिसरातील घटना लिहून पाठवणे त्यास वार्तालेखन म्हणतात.


१२.शैलीयुक्त लेखनाची वैशिष्टे :
१.शैली हा लेखनाचा प्राण आहे.
२.अनुभवाशी एक निष्ठ असलेले लेखन म्हणजे शैलीयुक्त लेखन होय.
३.समर्पक शब्द योजना असावी .
४.प्रवाह व लयबध्दता असावी.
१३.रसास्वाद परीक्षण (रसग्रहण लेखन )एखाद्या कविचे किंवा पद्य काव्याचे परीक्षण करतांना लक्षात घ्यावयाच्या गोष्टी :
१.शब्द सौदर्य .
२.अर्थ सौदर्य .
३.भाव सौदर्य.
४.काल्पन सौदर्य.
५.अलंकार सौदर्य .
६.विचार सौदर्य .

१४.लेखन मूल्यमापन करण्याचे साधने :
परीक्षा
१.निरीक्षण : १.अक्षराचे वळण. २.शुध्द लेखन.
२.लेखी परीक्षा : १.दिर्घोत्तरी प्रश्न . २.लघुत्तरी प्रश्न . ३.वस्तुनिष्ठ प्रश्न .
३.प्रात्याक्षिके : १.हस्ताक्षर स्पर्धा ,वैयक्तिक नोंदी, प्रासंगिक नोंदी, पडताळा सुची .
मुख्य पृष्ठ